कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असून, न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले.
In today’s meet with CBSE, we discussed that providing safe environment for students is our priority. We will tell the SC that last year was unfortunate for students. 2nd #COVID19 wave is going on and an anticipated 3rd wave is yet to come: Maharashtra Edu Min Varsha Gaikwad pic.twitter.com/U7WaM9V4Zi
— ANI (@ANI) May 23, 2021
Advertisement
‘सीबीएसई’तर्फे बारावीच्या परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला. याबाबत गायकवाड यांनी भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, की “बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षेबाबत चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा पाहूनच यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका आपण मांडली.”
त्या म्हणाल्या की, “सरकार आपली भूमिका उच्च न्यायालयासमोर मांडणार आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होत आहे. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाइन परीक्षेचा विचार करता येत नाही. त्यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे.”
मुंबई हायकोर्ट सहानुभूतीने निर्णय घेईल. बारावीच्या परीक्षा महिनाभरानंतर घ्याव्यात, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.